Ad will apear here
Next
विसाव्या शतकातील मातंग समाज
भारतीय समाजरचना ही जाती व्यवस्थेवर अवलंबून आहे. यात देशातील सर्व राज्यांत विविध नावाने अस्तित्वात असलेला मातंग हा एकमात्र समूह आहे, अशी माहिती देऊन प्रा. सोमनाथ डी. कदम यांनी ‘विसाव्या शतकातील मातंग समाज’मधून सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय व शैक्षणिक परिवर्तनाला सामोरे गेलेल्या मातंग समाजाचा इतिहास कथन केला आहे.

मातंग संज्ञेचा अर्थ, त्याची व्युत्पत्ती, मातंग जातीची उत्पत्ती, त्या विषयीच्या दंतकथा, मातंगांचा प्राचीन धर्म, मातंग राज्ये व त्यांचे राजे, मातंग समाजातील संत, भारतातील मातंग समाज व त्यातील जाती-पोटजाती, महाराष्ट्रातील मातंग समाज यांची माहिती समजते. भारतात ब्रिटिशांचे राज्य आल्यावर मातंग समाजाची स्थिती, त्याची बोलीभाषा, शैक्षणिक स्थिती, विविध चळवळीतील त्याचा सहभाग याबद्दल नमूद करून आंबेडकरपूर्वकालीन, आंबेडकरकालीन व स्वातंत्रोत्तर मातंग समाजाचे वर्णन करताना समाजासाठी झातालेल्यांचे व्यक्तिचित्रण, संस्था-संघटना, लढे-चळवळी यांचा इतिहास सांगितला आहे. समाजाचे समकालीन वास्तव व पुढील दिशाही यातून स्पष्ट केली आहे.

पुस्तक : विसाव्या शतकातील मातंग समाज
लेखक : सोमनाथ कदम
प्रकाशक : संवाद प्रकाशन
पाने : १४३
किंमत : १५० रुपये

(या पुस्तकाचा सविस्तर परिचय वाचण्यासाठी येथे क्लिक करा)

(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)


 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/MZJIBW
Similar Posts
मातंग समाजाच्या अभ्यासातील एक महत्त्वाचा दस्तऐवज नव्या पिढीतील एक लोकप्रिय लेखक म्हणून प्राध्यापक डॉ. सोमनाथ डी. कदम यांना ओळखले जाते. समाजाच्या तळागाळातील लोकांचा वंचित इतिहास तसेच सामाजिक, आर्थिक प्रश्न मांडणारे संशोधनपर लेखन हे त्यांच्या लेखनाचे ठळक वैशिष्ट्य. ‘विसाव्या शतकातील मातंग समाज’ या त्यांच्या तिसऱ्या पुस्तकाचे नुकतेच कोल्हापूर येथे प्रकाशन झाले
मातंग समाजाचा इतिहास जातीभेदाची दाहकता आता कमी झालेली असली, तरी ‘जी जात नाही ती ‘जात’ हे वास्तव आहे. भारतातील प्रत्येक जातीचा एक इतिहास आहे. त्या पैकी एक मंग (मातंग) ही जात असून, या समाजाच्या पोटजाती, भाष संस्कृती, रीतीरिवाज व ऐतिहासिक, शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक महत्त्व असले, तरी यातील समाज उपेक्षितच राहिला आहे,’ असे सांगत डॉ
ऋग्वेदाचे सामाजिक अंतरंग भारतातील अनेकविध जाती, धर्म यांना एकत्र बांधून भाषा, वंश, धर्म, लिंगविरहित समान अधिकार भारतीय राज्यघटनेने नागरिकांना बहाल केले आहे. प्राचीन काळातील वेदाज्ञेची जागा राज्यघटनेने घेतली आहे. सर्व वेदांचे मूळ असणारा ऋग्वेद व त्यातील ज्ञान वाचकांपर्यंत पोचविण्याचा प्रयत्न अॅड. शंकर निकम यांनी ‘ऋग्वेदाचे सामाजिक अंतरंग’मधून केला आहे
मला उमजलेले जे. कृष्णमूर्ती ‘शिस्त म्हणजे दबाव किंवा नियंत्रण नव्हे’, ‘तरुण मन ताजं असतं. काळाची बाधा त्याला होत नाही’, ‘नातं म्हणजे जीवन आहे’, ‘भय आणि सुख या एकच नाण्याच्या दोन बाजू आहेत. भयरहित व्हायचं असेल, तर सुखावेगळं व्हावं लागेल’, ‘आपण आणि ही निरर्थकता वेगळी नाही. मी आणि ‘कुणी नाहीची पोकळी’ एकत्र आहे’, जे. कृष्णमूर्ती यांची

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language